राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ! सेवानिवृत्तीनंतर ,सेवा पुस्तकामध्ये हमखास घेतले जाते हे आक्षेप.

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकामध्ये अनेक आक्षेप सुवानिवृत्तीनंतर घेण्यात येतात . यापैकी काही महत्वाचे आक्षेप खालीलप्रमाणे विशद करण्यात आलेले आहेत.

  1. सेवापुस्तकातील रजालेखा अपुर्ण / रजा लेखा चुकीचा असणे .
  2. वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे .
  3. सेवापुस्तकात मराठी / हिंदी भाषा सुटची नोंद नसणे .
  4. चारीत्र्य पडताळणी झाल्याबाबतची नोंद नसणे .
  5. स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे .
  6. स्वग्राम घोषित केल्याबाबतची नोंद नसणे .
  7. टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण नोंद नसणे.
  8. कार्यालय प्रमुखाने पहील्या पानावरील नोंद प्रमाणित न करणे . (दर 5 वर्षांनी )
  9. गटविमा योजना वर्गणी कपात रक्कम नोंद नसणे.
  10. सेवापुस्तक पडताळणी नोंद नसणे .
  11. पदोन्नतीची वेतननिश्चिती चुकिच्या वेतनस्तरावर करणे .
  12.  रक्कमांचे अतिप्रदान होणे.
  13. रजा रोखीकरणाचे अतिप्रदान .
  14. नामनिर्देशन प्रमाणपत्राची नोंद नसणे.
  15. आश्वासित प्रगती योजना चुकीच्या वेतनश्रेणीवर लावणे.
  16. एकस्तर वेतनश्रेणी चुकीच्या वेतनावर लावणे.

 वरील आक्षेप हे महत्वाचे आहेत .त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीपुर्वीच वरील आक्षेपाची पुर्तता करुन घ्यावी .ज्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी अडचण येणार नाही.

Leave a Comment