राज्य शासन सेवेतील नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली , अहेरी व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील पोलिस ठाणी / पोलिस उपठाणी / सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालये येथे व अतिसंवेदनशिल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध शाखांमधील पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देणेबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाकडुन दि.03.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे .
नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत गृह विभागाच्या पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात येणार आहे .यामध्ये पोलिस खात्यातील विविध शाखांचे अधिकारी / कर्मचारी अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत तैनात असेपर्यंत त्यांना करावे लागणारे जोखमीचे काम विचारात घेवून सदर कालावधीसाठी मिळत असलेल्या अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे .राज्य गुप्तवार्ता विभागतील अधिकारी /कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कार्यरत असले तरी त्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय आहे . परंतु नक्षलग्रस्त भागामध्ये कामाचे स्वरुप लक्ष्यात घेवून राज्य शासनाकडुन सदरचा निर्णय घेण्यात आला आहे .
तसेच राज्यातील राज्य राखीव पोलिस बलातीमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना उक्त संवेदनशील भागात कार्यरत असतील तोपर्यंतच त्यांना दीडपट दराने अनुज्ञेय वेतन व महागाई भत्ता लागु असणार आहे .त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडुन नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना लागु केलेल्या इतर आर्थिक सवलती अनुज्ञेय असणार नाहीत .
सदरचा निर्णय वरील नमुद कर्मचाऱ्यांना दि.01.04.2022 ते दि.31.03.2023 या कालावधीच्या वेतनभत्यासाठी लागू असणारा आहे .याबाबतचा राज्य शासनाच्या गृह विभागाचा दि.03.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !