राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . यामुळे ऐन दिवाळी सणाच्या मुहुर्तावर कर्मचाऱ्यांसाठी मोठी निराशा येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली सवलत अखेर रद्द होण्याची चिन्हे समोर येत आहेत .या संदर्भातील नेमकी सविस्तर बातमी काय आहे , सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी होती .परंतु तत्कालिन मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाच्या मंत्रालयासह सर्व कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यास मान्यता देण्यात आली आहे . या निर्णयावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुनर्विचार करुन पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याची शक्यता वर्तविली जात आहे . कारण मंत्रालयामध्ये कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा झाल्याने , कामाच्या तासांपेक्षा जास्त तास काम करावे लागत आहे . यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवून अडचणी सांगितल्या आहेत .
शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात येत असल्याने , सरकारकडुन कामाचा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता आहे .आता पुर्वीप्रमाणे शनिवारी देखिल मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालये सुरु हाेतील .यामुळे कर्मचाऱ्यांना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली सुट्टीची सवलत रद्द होण्याच्या मार्गावर आहे .
अशा प्रकारचे वृत्त ,दैनिक वृत्तामार्फत देण्यात आले होते ,या वृत्ताचे खंडण करणेसंदर्भात पत्र निर्गमित झाले आहे .याबाबतचे सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे आहे.

- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !