राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी खुशखबर मिळणार आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकारप्रमाणे 60 वर्षे होणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे .या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात …
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे –
राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे . विविध कर्मचारी संघटनांकडुन याबाबत राज्य सरकारला वेळोवेळी निवेदनही दिले आहेत . केंद्र व इतर 25 राज्यांनी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आली आहे .देशातील बहुतांश राज्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविले आहेत , तरी महाराष्ट्र राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वयामध्ये वाढ न केल्याने राज्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी आहे .
सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक –
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सरकारी नोकरींच्या स्पर्धेमध्ये अनेक जन नशिब आजमवत असतात . काहींना कमी वयामध्ये यश मिळते , तर अनेकांना सरकारी नोकरीसाठी अनेक वर्षे कष्ट करावे लागते यामुळे नोकरीमध्ये दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय हे 28 वर्षे ते 35 वर्षे या दरम्यान आहे . यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कमी सेवा मिळते .
2 वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल –
कर्मचाऱ्यांच्या मागणींचा विचार करुन राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे केल्यास , राज्यातील कर्मचाऱ्यांना 2 वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशनांमध्ये सदरचा विषय चर्चेला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
कर्मचारी विषयक ,भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !