वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रिक कार्यपद्धती करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.10.06.2019 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सुधारित शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार , वयाच्या 50/55 व्या वर्षी / 30 वर्षे अर्हताकारी सेवा झालेल्यापैकी अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना लोकहिताच्या दृष्टीने मुदतपुर्व सेवानिवृत्ती करावे असे शासनाचे धोरण आहे .राज्य शासन सेवेमध्ये 35 व्या वर्षापुर्वी आलेल्या वर्ग – अ व वर्ग ब च्या राजपत्रित अधिकाऱ्यांचे त्यांच्या वयाची 50 वर्षे पुर्ण होतेवेळी अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण होते वेळी यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी एकदाच पुनर्विलोकन करण्यात येईल .
वर्ग क व वर्ग ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या 55 व्या वर्षी किंवा त्यांच्या अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा पुनर्विलोकन करण्यात येईल .
शासन सेवा पुढे सुरु ठेवण्याकरीता पात्रापात्रता आजमाविण्यासाठी शारीरिक क्षमता / प्रकृतिमान , निर्विवाद सचोटी व चांगल्यापेक्षा कमी नाही असा गोपनिय अभिलेख असणे आवश्यक आहे . तसेच शारीरिक क्षमता / प्रकृतिमान , निर्विवाद सचोटी व प्रतिकृल नसतील असे वैयक्ति नस्तीमधील अभिप्राय असणे आवश्यक आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडुन निर्गमित झालेला सुधारित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !