शासकीय कर्मचाऱ्यांकडुन एक दिवसाची भारत बंदची हाक ! देशातील सर्व कर्मचारी घेणार भारत बंदमध्ये सहभाग .

Spread the love

सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन योजना रद्द करुन नविन पेंशन योजना लागु केलेली आहे , परंतु या नविन पेन्शन योजनेंमध्ये सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाह चालत नाही . यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याकरीता कर्मचाऱ्यांकडुन आपल्या न्याय , अधिकारांसाठी एक दिवसीय भारत बंदची हाक दिली आहे .

जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता देशाभरातील सुमारे 36 लाख शासकीय कर्मचारी एकत्रित येणार आहेत .नॅशनल रेल्वे मजदूर यूनियनच्या वार्षिक अधिवेशन नागपुर येथे होणार आहे , यावेळी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यावेळी बालताना सांगत होते कि , 50 हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला साधारण अडीच हजार रुपये पेंन्शन मिळते .तर जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांस 25,000/- रुपये निवृत्तीवेतन मिळायचे .

सध्या देशभरांमध्ये जुनी पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांकडुन आंदोलने करण्यात येत आहेत . काही राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्ष्यात घेवून जूनी पेन्शन योजना लागु केली आहे .महाराष्ट्र राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागु केल्यास राज्य सरकार दिवाळखोरीत जाईल असे भाष्य अधिवेशनांमध्ये केल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु होण्याची अशा मावळताना दिसत आहेत .

परंतु विविध संघटनांकडुन देशपातळीवर जुनी पेन्शनच्या मागणीकरीता विविध अधिवेशन घेवून , सरकारला कोंडीत काढण्यात येणार आहेत .जर सरकार याबाबत सकारात्मक भुमिका घेत नसल्यास , सरकारकडुन लवकरच भारत बंदची हाक देण्यात येणाार आहे .यामध्ये देशाभरातील सुमारे 36 लाख कर्मचारी सहभाग घेतील .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातमींच्या अपडेटसाठी Join करा Whatsapp ग्रुप

Leave a Comment