Lockdown : कोरोनाचा वाढता प्रभाव , पुन्हा लॉकडाउन ! सरकारचे जारी केले नवे संकेत .

Spread the love

व्हायरल मुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागत आहे. त्यामुळे सरकार नवीन प्लॅन तयार करत आहे तर बघूया सरकारचा कोणता प्लॅन आहे त्याबद्दल जाणून घेऊया.सरकारची तयारी बघून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक सावधगिरी बाळगत आहे. परंतु तज्ञाचे मतानुसार,सावधानी बाळगणे खुप आवश्यक आहे. परंतु घाबरण्याची गरज नाही.

कोरोनाच्या नवीन लाटेच्या भीतिमुळे केंद्र सरकारने गेल्या 3-4 दिवसात कोरोनाचा सामना करण्यासाठी उपाययोजना आहे तयार केल्या होत्या. आणि राज्यात नवीन सूचना देण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्गाच्या तीव्रतेवर आणि जीनोम सिक्वेंन्सिंगच्या परिणामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तात्काळ कडक नियम होण्याची शक्यता नाही. संक्रमणामध्ये गुणात्मक वाढ होणार नाही आहे. वाढ होत आहे असे दिसून आल्यास त्वरित उपाययोजना करण्यात येईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड़ेवारीनुसार, देशात सरसरी 1.25 लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहे. आणि रोज आढळलेले रुग्णांची संख्या 200 पेक्षा कमी आहे. संसर्ग दर 0.15 टक्के किंवा त्यावरुन कमी आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून हा दर सर्वात कमी आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.

चीनसह इतर काही देशात वाढते प्रकरण पाहता व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यासाठी आता काही उपाय केले जात आहे. कारण गेल्या 2 वर्षात भारताने महामारीच्या काळात ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. मोनिटरिंग,कोरीना तपासणी, जीनोम सिक्वेंन्सिंग, हॉस्पिटल मधील लाइट सपोर्ट सिस्टीम ,ऑक्सिजनची उपलब्धता इत्यादी घटक यामध्ये महत्वाचे आहे.

दूसरा प्रयत्न म्हणजे बहुतेक जीनोम सिक्वेंन्सिंग करणे आवश्यक आहे. यामुळे कोविडचे कोणताही नवा व्हेरिएंट वेळेतच समजेल. अल्फा डेल्टा आणि ओमिक्राॅन प्रकार आणि त्याचे अनेक उपप्रकार इथे आहेत. आणि भारतीयांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिकारशक्ति विकसित केली आहे. चीन मध्ये कहर करत असलेल्या omicron च्या Bf.7 सब व्हेरिएंटचाही भारताला धोका नाही.तो जुलैपासून भारतात आहे. पण आणखी संसर्गजन्य नवीन प्रकार जन्माला आला तर धोका वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment