शासकीय कर्मचाऱ्यांवर होतोय मोठा अन्याय ! पेन्शन बाबत शासनाकडुन होतोय भेदभाव !

Spread the love

सध्या देशांमध्ये जुनी पेन्शन या मुद्द्यांवर देशातील कर्मचारी आक्रमक भुमिका घेत आहेत . कारण अधिवेशनांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी जाहीर केले कि , राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागु करणार नाही . असे ठामपणे भुमिका मांडल्याने , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत शासनाच्य अन्यायाविरुद्ध जनजागृत्ती मोहिम काढली आहे .

आम्ही नोकरशाहीतील नोकर , आम्हांला कोण देणार पेन्शन ?

सन 2003 साली एनडीए सरकारने देशातील शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला . परंतु या योजनेमध्ये लोकप्रतिनिधीनीं मात्र स्वत: जुनी पेन्शन योजनाच कायम ठेवली .समर्पण भावेनेने आयुष्यभर देशसेवा करणाऱ्या निस्वार्थ कर्मचाऱ्यांची म्हातारपणाची काठी – पेन्शन हिरावून घेतली आहे .शासन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन  योजना लागू करण्यास टाळाटाळ करीत असून , लोकप्रतिनीधी मात्र स्वत: मात्र जुनी पेन्शन व इतर लाभ घेत आहेत .

मात्र 30 ते 35 वर्षे सेवा करणारे कर्मचारी मात्र जुनी पेन्शनपासुन वंचित राहत आहेत .या अन्यायाच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडुन जनजागृती काढण्यात येत आहेत .सध्या देशांमध्ये देशाचे राष्ट्रपती , मा.पंतप्रधान , मुख्यमंत्री , आमदार व खासदार यांना जुनीच पेन्शन योजना लागु आहे . परंतु कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत लोकप्रतिनिंधींचा कोणताच विचार नाही .

सरकारी कर्मचारी विषयक ,सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment